Thursday, January 08 2026 | 07:20:52 PM
Breaking News

राजस्थानमध्ये जयपूर-अजमेर महामार्गावर झालेल्या रस्ते अपघाताबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले,मदतीची घोषणा केली

Connect us on:

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राजस्थानमधील जयपूर-अजमेर महामार्गावर झालेल्या अपघाताबद्दल शोक व्यक्त केला.पंतप्रधानांनी या दुर्घटनेतील प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून 2 लाख रुपयांची आणि जखमींना 50,000 रुपयांची मदतही देण्याची घोषणा देखील केली आहे.

यासंदर्भात पंतप्रधान कार्यालयाने एक्स या समाजमाध्यमावर केलेली पोस्ट :

राजस्थानमध्ये जयपूर-अजमेर महामार्गावर झालेल्या रस्ते अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल खूप दुःख झाले.आपल्या जिवलगांना गमावलेल्यांप्रती माझ्या शोकसंवेदना.जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो.स्थानिक प्रशासन मदत कार्य करत आहे.मृतांच्या कुटुंबियांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी दोन लाख रुपयांची आणि जखमींना 50,000 रुपयांची मदत दिली जाईल.”

 

भारत : 1885 से 1950 (इतिहास पर एक दृष्टि) व/या भारत : 1857 से 1957 (इतिहास पर एक दृष्टि) पुस्तक अपने घर/कार्यालय पर मंगाने के लिए आप निम्न लिंक पर क्लिक कर सकते हैं

सारांश कनौजिया की पुस्तकें

ऑडियो बुक : भारत 1885 से 1950 (इतिहास पर एक दृष्टि)

 

About Matribhumi Samachar

Check Also

केंद्रीय मंत्री राजीव रंजन सिंह तेलंगणामध्ये स्मार्ट हरित मत्स्यपालन फार्म आणि संशोधन संस्था तसेच अत्याधुनिक री-सर्क्युलेटरी ॲक्वाकल्चर सिस्टीम (आरएएस) सुविधेचे उद्घाटन करणार

केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालय आणि पंचायती राज मंत्रालयाचे मंत्री राजीव रंजन सिंह उर्फ …