नागपूर 9 फेब्रुवारी 2025. भारताने औद्योगिक क्रांतीचे नवे स्वरूप 4.0 ही संधी गमावून चालणार नाही असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले असून औद्योगिक क्षेत्राकडून त्यांच्या अपेक्षा आहेत. अश्यातच खासदार औद्योगिक महोस्तव या आयोजनातून आपण विदर्भाचे खरे सामर्थ्य सादर केल्याचे प्रतिपादन प्रतिपादन मुख्य अतिथी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी आज केले.
असोसिएशन फॉर इंडस्ट्रिअल डेव्हलपमेंट चया वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परिसरात सुरू असलेल्या तीन दिवसीय एडव्हांटेज विदर्भ – 2025 खासदार औद्योगिक महोत्सवाच्या समारोप समारंभात ते बोलत होते. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी प्रामुख्याने उपस्थित होते .
विदर्भात नागपूर -बुटीबोरी दरम्यान ग्लोबल युनिव्हर्सिटी ऑफ स्किल अँड लॉजिस्टिक्स तयार करण्याचा प्रस्ताव गडकरींनी दिल्याबद्दल त्यांनी कौतुक केले. या अर्थसंकल्पात देशात १०० प्लग अँड प्ले औद्योगिक क्षेत्र तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला असून यात महाराष्ट्र आघाडीवर राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
केंद्र सरकार मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा वाढवत असून यामुळे रोजगार निर्मिती होत आहे. एकूणच उपभोग आधारित विकास आणि पायाभूत आधारित विकासाने दुप्पट गतीने देश प्रगती करत असल्याचे ते म्हणाले. यात महाराष्टाने १ ट्रिलियन चे योगदान द्यावे असे गोयल म्हणाले.
सुरवातीला प्रस्ताविकातून एआयडी अध्यक्ष आशीष काळे यांनी यंदाचा महोत्सव अनेक सामंजस्य करार ( एमओयू ) आणि वैचारिक बौद्धिक देवाण घेवाण झाल्याने यशस्वी झाल्याचे सांगितले.
यावेळी प्रयोजकांचा सत्कार करण्यात आला. महोत्सवाला जवळजवळ दीड लाख पेक्षा अधिक लोकांनी भेट दिली.
आर्टिफिशियल इलेक्ट्रॉनिक इंटेलिजंट मटेरियल लिमिटेड हे नागपुरात इलेक्ट्रॉनिक सेमीकंडक्टर क्षेत्रात नागपुरात १० हजार कोटींची गुंतवणूक करणार असून ५०० रोजगार निर्मिती होणार आहे. राज्य सरकार कडून उद्योग सचिव पी. अनबलगन यांनी हा करार केला.
श्रेम ग्रुप ऑफ कंपनीज बायोइंधन क्षेत्रात विदर्भात ८०० कोटींची गुंतवणूक करणार असून त्यातुन १०० रोजगार निर्माण होणार आहे. राज्य सरकार कडून उद्योग सचिव पी. अनबलगन यांनी हा करार केला.
ओलेक्ट्रा इव्हीचे चेयरमन के व्ही प्रदीप यांनी नागपुरात होऊ घातलेल्या गुंतवणुकी बद्दल माहिती दिली. हा सामंजस्य करार दावोस मध्ये झाला होता.
अत्यंत यशस्वी अश्या खासदार औद्योगिक महोत्सवाच्या दुसऱ्या आवृत्ती मधून विविध प्रकल्पांमधून साडेसात लाख कोटींची गुंतवणूक विदर्भात होत आहे. याशिवाय गडचिरोली जिल्ह्यात जगात सर्वात उत्तम दर्जाचे लोहखनिज असून यामुळे नजीकच्या जिल्ह्यात मोठमोठे उद्योग सुरु होतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. नागपूरच्या एमआरओ मध्ये बोईंग चे काम सुरु असून नागपूर एव्हिएशन हब होत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
भारतातले सर्वात मोठे लॉजिस्टिक हब नागपूर आणि वर्ध्याच्या मध्ये निर्माण होत आहे, यामुळे जगात कुठेही आणि कितीही निर्यात नागपुरातून होऊ शकेल. गती शक्तीची स्किल युनिव्हर्सिटी याचा अभ्यास करून ग्लोबल युनिव्हर्सिटी ऑफ स्किल अँड लॉजिस्टिक्स तयार करण्याचा प्रस्ताव एआयडी चमू ने दिला असायची माहिती गडकरी यांनी दिली. या साठी महाराष्ट्र सरकारने १०० एकर जागा द्यावी असे निवेदन गडकरी यांनी केले.
खासदार औद्योगिक महोत्सवाच्या सफल आयोजनासाठी एआयडीचे कौतुक करून मुख्यमंत्री फडणवीस यांनी सामंजस्य करारातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीची अपेक्षा व्यक्त केली. आज विदर्भाच्या प्रत्येक क्षेत्रात विकास होत असून त्या क्षेत्रांना मंच देण्याचे काम महोत्सवात झाल्याचे ते म्हणाले. याशिवाय विदर्भाचा समग्र विकास हा उदेष्य असून यासाठी नागपूर आणि अमरावती हे मॅग्नेट क्षेत्र तयार करण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे ते म्हणाले. यामुळे नजीकच्या भागांचा विकास होईल असे मत त्यांनी व्यक्त केले. आगामी क्षेत्रात पर्यटन आधारित कॉन्क्लेव्ह व्हावे असे ते म्हणाले.
या कार्यक्रमाला स्थानिक लोकप्रतिनिधी,असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट चे पदाधिकारी उद्योजक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते
Matribhumi Samachar Marathi

