प्रभावी नेतृत्व, स्वयंशिस्त आणि वैयक्तिक विकासासंदर्भातील महत्त्वाच्या घटकांवर लक्ष केंद्रित करत केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी आज सोल लीडरशिप परिषदेत अभ्यासपूर्ण भाषण केले. केंद्रीय मंत्र्यांनी त्यांच्या भाषणात अधिक उत्तम कार्य करण्याप्रती कटिबद्ध असलेले नेते घडवण्यासाठी निरंतर अभ्यास, वैयक्तिक वर्तणूक आणि तात्विक विचार मंथनाचे महत्त्व ठळकपणे नमूद केले. निरंतर …
Read More »भारत आणि जपानमधील धर्म गार्डियन या संयुक्त लष्करी सरावाच्या सहाव्या पर्वात सहभागी होण्यासाठी भारतीय लष्कराची तुकडी रवाना
भारत आणि जपानमधील धर्म गार्डियन या संयुक्त लष्करी सरावाच्या सहाव्या पर्वात सहभागी होण्यासाठी भारतीय लष्कराची तुकडी रवाना झाली आहे. येत्या 24 फेब्रुवारी ते 9 मार्च 2025 या कालावधीत जपानच्या पूर्व फुजी प्रशिक्षण क्षेत्रात हा सराव होणार आहे. धर्म गार्डियन या लष्करी सरावाचे दरवर्षी भारत आणि जपानमध्ये आलटून पालटून आयोजन केले …
Read More »केंद्र सरकारने कोचिंग केंद्रांकडून मिळालेल्या परताव्याच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रातील होतकरुंना आणि विद्यार्थ्यांना 1.56 कोटी रुपये मिळवून दिले
केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाने शिक्षण क्षेत्रातील होतकरुंना आणि विद्यार्थ्यांना यशस्वीपणे 1.56 कोटी रुपयांचा परतावा मिळवून दिला. नागरी सेवा, अभियांत्रिकी अभ्यासक्रम तसेच इतर शैक्षणिक कार्यक्रमांसाठी कोचिंग केंद्रांमध्ये प्रवेश घेतलेल्या या विद्यार्थ्यांना सदर केंद्रांनी घालून दिलेल्या नियम व अटींचे पालन करुनही यापूर्वी त्यांच्या हक्काचा परतावा मिळण्यास नकार देण्यात आला होता. तक्रारींच्या निराकरणासाठी सुव्यवस्थित प्रक्रिया …
Read More »केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्रात पुण्यामध्ये जनता सहकारी बँकेच्या हीरक महोत्सवी समारोप सोहळ्याला केले संबोधित
केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी आज महाराष्ट्रात पुण्यामध्ये जनता सहकारी बँकेच्या हीरक महोत्सवी समारोप सोहळ्याला संबोधित केले. केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. जनता सहकारी बँकेने संपादन केलेला विश्वास ही आपल्या सर्वांसाठीच अभिमानाची बाब …
Read More »पंतप्रधानांच्या हस्ते बिहारमधील भागलपूर येथे 24 फेब्रुवारी 2025 रोजी पीएम किसान योजनेच्या 19 व्या हप्त्याचे वितरण
केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्र्यांनी शुक्रवारी पीएम किसान योजनेच्या आगामी 19 व्या हप्त्याच्या वितरणासंबंधीची माहिती माध्यमांना दिली. 24 फेब्रुवारी 2019 रोजी सुरू झालेल्या पीएम किसान योजनेद्वारे पात्र शेतकरी कुटुंबाला दरवर्षी 6000 रुपये आर्थिक सहाय्य देण्यात येते. आतापर्यंत 18 हप्त्यांमध्ये देशभरातल्या शेतकरी कुटुंबांना 3.46 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम वितरीत करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या कल्याणाला मोदी सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे केंद्रिय मंत्री …
Read More »पंतप्रधान येत्या 23 ते 25 फेब्रुवारी दरम्यान मध्यप्रदेश, बिहार आणि आसामचा दौरा करणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 23 ते 25 फेब्रुवारी दरम्यान मध्यप्रदेश, बिहार आणि आसामचा दौरा करणार आहेत. दिनांक 23 फेब्रुवारी रोजी ते मध्य प्रदेशातील छत्तरपूर येथे पोहोचतील आणि दुपारी 2 वाजता त्यांच्या हस्ते तेथील बागेश्वर धाम वैद्यकीय आणि विज्ञान संशोधन संस्थेचा पायाभरणी समारंभ होईल. दिनांक 24 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता पंतप्रधान …
Read More »पंतप्रधान अंतर्वासिता योजनेच्या (PMIS) पथदर्शी टप्प्याच्या दुसऱ्या फेरीच्या प्रारंभाने पुन्हा एकदा अर्जदारांसाठी ही योजना खुली झाली आहे
नवी दिल्ली, 20 फेब्रुवारी 2025 पंतप्रधान अंतर्वासिता योजनेच्या (PMIS) पथदर्शी टप्प्याच्या दुसऱ्या फेरीच्या प्रारंभाने पुन्हा एकदा अर्जदारांसाठी ही योजना खुली झाली आहे. पहिल्या फेरीत 6 लाखांपेक्षा जास्त अर्ज आल्यावर, दुसऱ्या फेरीत भारतातील 730 पेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये आघाडीच्या कंपन्यांमध्ये एक लाखांपेक्षा जास्त अंतर्वासिता संधी उपलब्ध करण्यात येत आहेत. तेल, वायू आणि …
Read More »नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी विमान चालकांसाठी डिजिटल परवाना केला जारी
नवी दिल्ली, 20 फेब्रुवारी 2025 केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी आज विमान चालकांसाठी इलेक्ट्रॉनिक कार्मिक परवाना जारी केला.भारताच्या नागरी विमान वाहतूक क्षेत्रात सुरक्षा, संरक्षण आणि कार्यक्षमता यांना चालना देण्यासाठी तसेच आधुनिकता आणण्यासाठी हे महत्त्वाचे पाऊल आहे. अशा प्रकारे आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संस्थेकडून (ICAO )मंजुरी मिळाल्यानंतर …
Read More »पंतप्रधानांनी मिझोरामच्या जनतेला त्यांच्या राज्य स्थापना दिनानिमित्त दिल्या शुभेच्छा
नवी दिल्ली, 20 फेब्रुवारी 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिझोरामच्या जनतेला त्यांच्या राज्य स्थापना दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.मिझो संस्कृती,वारसा आणि सौहार्दाचे सुंदर मिश्रण प्रतिबिंबित करते,असे मोदी म्हणाले. मिझोरामची प्रगती होत राहो आणि त्याचा शांतता,विकास आणि प्रगतीचा प्रवास पुढील काही वर्षांत नवी उंची गाठो अशीही इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. आपल्या …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरुणाचल प्रदेशच्या नागरिकांना त्यांच्या स्थापना दिनाबद्दल दिल्या शुभेच्छा
नवी दिल्ली, 20 फेब्रुवारी 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरुणाचल प्रदेश स्थापना दिनाबद्दल तेथील नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.अरुणाचल प्रदेश हा समृद्ध परंपरा आणि निसर्गाशी जवळीक यासाठी ओळखला जातो,असे मोदी यांनी म्हटले आहे भावी काळातही अरुणाचल प्रदेशाची समृद्धी वाढत राहो आणि प्रगती तसेच ऐक्य असेच बहरत राहो’ असेही मोदी यांनी म्हटले आहे. …
Read More »
Matribhumi Samachar Marathi