सरकारने कोणत्याही तडजोडीविना प्राधान्य दिले आहे,” अशी ग्वाही मोदींनी दिली.
भाषणाचा समारोप करताना पंतप्रधान म्हणाले की विकसित भारताच्या संकल्पनेने प्रगती, निसर्ग आणि संस्कृती यांना समप्रमाणात एकत्र केले पाहिजे. या द्रुतगती महामार्गाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधानांनी दिल्ली, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि संपूर्ण देशाचे हार्दिक अभिनंदन केले. “देशभक्ती, निष्ठा आणि सर्वंकष विकास यांचे एकत्रीकरण करून आम्ही अशा प्रकारे खऱ्या अर्थाने विकसित भारताची उभारणी करत आहोत,” असे पंतप्रधान मोदींनी आश्वासक सुरात सांगितले.
Matribhumi Samachar Marathi

